Posts

Showing posts from August, 2015

शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!!

Image
शानदार!! जबरदस्त!!! ज़िंदाबाद!!! असेच काहीतरी वाटेल तुम्हाला ‘माँझी- धि माउंटेन मॅन’ चित्रपट बघून. एक साधीशी स्टोरी घेऊन तुम्हाला जर नवाजउद्दीन सिद्दीक्की सारखा ऍक्टर (हीरो नाही) आणि केतन मेहता सरखा डायरेक्टर भेटला असेल तर तुम्ही एक अप्रतिम कलाकृती सादर करू शकता. हयाचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘माँझी- धि माउंटेन मॅन’. सत्यकथेवर आधारित चित्रपट बनवताना खूप काही गोष्टीचे तारतम्य बाळगावे लागते. सत्यकथेला फाटा न देता त्यात रोमांस, गरीबी, कॉमेडी टाकत चित्रपट सजवणे तसे म्हटले तर मुश्कील असते. पण लेखकांच्या टीमने आणि डाइरेक्टर ने ते चांगले हाताळले आहे आणि आपल्या समोर एक व्यवस्थित बांधलेली कलाकृती सादर केली आहे. राधिका आपटेने सुद्धा तिला मिळालेल्या संधीचे चांगले सोने केले आहे. तिचा अभिनय पण अप्रतिम झाला आहे. तिचे मॉडर्न लुक बघायची सवय झालेली असून सुद्धा तिचा गावरान लुक चित्रपट संपल्यावर ही लक्षात राहतो. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अथांग प्रेमं असले की पर्वत ही माणसा पुढे फिका पडतो हेच ह्या चित्रपटात दाखवले आहे. मग त्यात येणारे नैसर्गिक अडथळे, मानवी अडथळे, शारीरिक अडथळे सुद्...
Image
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥ नमस्कार! आपल्या आयुष्याला चैतन्याचा, मांगल्याचा, प्रसन्नतेचा साज चढवणारा गणेशोत्सव सुरू झालाय. आरतीचे स्वर ऎकू येत आहेत. सुवासिक अगरबत्ती, सुगंधी फुलं यांनी आसमंत भरून गेलाय. फळं, फुलं, पत्री, दुर्वा, विविध प्रकारच्या मिठाया, सजावटीचं सामान यांनी बाजारपेठा फुलून गेल्यात. एकंदरीत काय अनंतचतुर्दशीपर्यंत वातावरण भारलेलं असणार आहे. गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या आनंदाचा, अभिमानाचा आणि भक्तिभावाचा विषय आहे. सर्वजनिक गणेशोत्सवाला तर शंभर वर्षाहून मोठी परंपरा आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने तर दरवर्षीच साजरा होतो. पण आपलं जे दैवत आहे त्याच्या गुणांचं अनुकरण करणं, त्याच्या वागण्याचा आदर्श आपल्या आचरणातून व्यक्त होणं म्हणजेच त्याची खरी उपासना आहे याचा मात्र विसर पडायला नको. ‘गणेशाची गुणाने पूजा बांधणे’ हे केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजहिताच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीनेही आवश्यक ठरतं. गणेश ही देवता सर्वसमावेशक आहे. मानवी जीवन सर्वांगाने फुलावं - बहरावं अशी शिकवण गणपती बाप्पा आपला सखासांगाती...
व्यर्थ न हो बलिदान ! "मुंबै'' कुणाची, मराठी माणसांची? छे छे! विसरा ती स्वप्ने कायमची ! १९६० साली महाराष्ट्रराज्यनिर्मिती झाली तेव्हा मुंबईत मराठी माणसाचे प्रमान ५४ टक्के होते. आज २५ वर्षांनंतर ते २५ टक्क्यांहून कमी आहे. मोडकळीला आलेली मराठी माणसांची घरे, जागांच्या किंमतीत झालेली बेसुमार वाढ, प्रचंड लोकवस्ती आणि प्रतिदिनी "मुंबै" वर आदळणारे परप्रांतीयांचे लोंढे, याची परिणती अटळ आहे. सुईच्या अग्रावर राहील एवढी जमीनही मऱ्हाठी माणसाच्या वाट्याला या पुढच्या काळात येणार नाही. उद्ध्वस्त संसार पाठीवर घेऊन स्वतःच्याच राज-धानीतून परागंदा होण्याचा प्रसंग त्यांच्यावर गुदरणार आहे. त्यांच्या ललाटी अन्य काही नाही. महाराष्ट्राचे भाषिक राज्य अस्तित्वात येऊन १ मे १९८५ रोजी पंचवीस वर्षे पूर्ण होतात. ज्या हेतूने हे राज्य, रक्त नेहमीच सांडून अस्तित्वात आले, ते हेतू सफल झालेले नाहीत. दिल्लीची सत्ता नेहमीच महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि विकासाचा गळा दाबीत आली आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न चालू आहेत. मुंबईतून मराठी माणूस परागंदा होत आहे. भाषिक ...

Friends forever

Image