माझ्या घरात एक छोटंसं झाड आहे. रोज त्याला पाणी घालतो, त्याच्यावर प्रेम करतो. एक दिवस विसरलो… आणि दोनच दिवसांत त्याच्या कोवळ्या फांद्या वाकायला लागल्या. तेव्हा जाणवलं – कुठलीही गोष्ट टिकवायची असेल, तर तिला प्रेम, काळजी आणि सातत्य हवं. मराठी भाषा सुद्धा असंच एक झाड आहे. ती आपली मुळं आहेत. जर आपणच तिला पाणी घालणं थांबवलं, तिला वापरणं कमी केलं, तिला मागे टाकलं… तर ती हळूहळू सुकून जाईल. आणि एक दिवस आपणच आपली ओळख हरवून बसू. आज महाराष्ट्रात वारंवार एक प्रश्न ऐकू येतो – “मराठी भाषा का गरजेची आहे?” काहींना वाटतं, मराठी फक्त शाळा, गाव आणि घरापुरती मर्यादित असावी. पण ही भाषा फक्त बोलण्याचं साधन नाही – ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. लहानपणी आपण सगळ्यांनी आजीच्या कुशीत झोपताना तिच्या गोष्टी ऐकल्या आहेत – त्या सगळ्या मराठीतूनच. ती गोष्टी सांगताना चेहऱ्यावरच्या हावभावातून संस्कार करत होती. “एक होता राजा...” म्हणणारी आजी जेव्हा एखाद्या गोष्टीला “उपकार विसरू नयेत” म्हणायची, तेव्हा फक्त शब्द नव्हते ते – ती आपल्याला आपली माती शिकवत होती, आपलं माणूसपण शिकवत होती. आजकाल मुलं इंग्रजीमध्ये बोलताना...
Comments
Post a Comment